आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण प्रत्येकजण घड्याळाच्या काट्याबरोबर स्पर्धा करीत जीवन जगत असतो. परंतु असे करताना आपले आणि शरीराचे अतोनात नुकसान करून घेत असतो आणि त्यापासून आपण अनभिज्ञ असतो. अशा जीवनशैलीमुळे आपल्या जैविक घड्याळाचा समतोल आपण विस्कळीत करून अनेक व्याधींना जन्म देत असतो. शरीराचे जैविक घडयाळ समतोल ठेवण्यामध्ये आपल्या जीवनशैलीतील महत्त्वाचे अंग म्हणजे आपला आहार.. हा आहार जास्तीत जास्त नैसर्गिक ठेवला असता आपण फक्त आजारांपासून लांब राहत नाही तर दीर्घकाळ सुदृढ असे आयुष्य सुद्धा जगू शकतो. ह्या साठी हे पुस्तक खरोखरीच मार्गदर्शक आहे.